देशभरातच काय जगातील अनेक वेगवेगळ्या घटना आपण घरबसल्या टीव्हीवर पाहतो, वर्तमानपत्रांमधून बातम्या लेख वाचतो. वाहिन्यांवर चर्चा ऐकतो. पण कधी कधी या सर्वांतून सत्य बाजू काय आहे हे पुढे येत नाही. देशातील काही घटना, प्रसंग यांच्यातील कंगोरे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सत्य सांगा ना...! मधून उलगडले आहेत.
उत्तर प्रदेशमधील कैराना गावातील हिंदू रहीवाशांना पलायन करावे लागले, नेपाळमधील भूकंपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदतीसाठी घेतलेला पुढाकार तसेच भारतात जरअसे संकट उद्भवले तर आपत्ती निवारणासाठी सरकारने दक्ष राहण्याची अपेक्षा, चंद्रशेखर आझाद व स्वातंत्र्यवीर सावरकर या क्रांतीकारकांची कॉंग्रेसने केलेली तुलना, हिंदुत्ववादी व पुरोगामी विचार.,
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी रंगलेले राजकारण यावर लेखकाने मते मांडली आहेत. केजीबी एजंट असलेल्या युरी अलेक्झान्ट्रोवीच बेझमेनोव्ह याने १९८५ मध्ये दिलेल्या मुलाखतीनुसार भारतातील वातावरण कसे होते याविषयी लेखकाचा दृष्टिकोन यातून मांडला आहे. अशा अनेक विषयांवरील लेखन यात वाचयला मिळते.